शिक्षक दिवाळीच्या सुट्टीत घरोघरी जाऊन भरतायेत मतदानचे संकल्प पत्र.

आबिद शेख/अमळनेर.दिवाळीची सुटू असूनही विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे , प्रलोभनाला व जातीपातीच्या राजकारणाला ,दबावाला बळी न पडता मतदान व्हावे म्हणून तालुक्यातील शिक्षक गावात घरोघरी जाऊन विद्यार्थी व पालकांचे संकल्प पत्र भरून घेत आहेत.


अमळनेर तालुक्यात ५ वि ते १२ विपर्यंत एकूण ५२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्याने विद्यार्थी व शिक्षक शाळेत येत नव्हते. मात्र निवडणूक कामासाठी शिक्षकांना संकल्प पत्र भरून घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्यानेशिक्षकांनी गावात जाऊन जनजागृती रॅली काढली तसेच विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून संकल्प पत्र भरून घेत त्यांच्या सह्या घेतल्या. तालुक्यातील मंगरूळ येथे स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील, संजय पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, वस्ती शाळेचे भटू पाटील, सचिन अहिरे, चंद्रशेखर पाटील, प्रवीण पाटील, मनोज पाटील, ग्रामसेवक संजीव सैंदाणे, तलाठी ए. बी. सोनवणे, प्राथमिक शाळेचे, उषा भदाणे, नीलम चौधरी, सोमनाथ विसपुते, गोपाळ सर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वासुदेव पाटील, रवींद्र पाटील, कोतवाल भटू पाटील यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे तसेच प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन केले.