स्मृती दिनानिमित्त भाजपाचे दिवंगत नेते स्व. उदय वाघांच्या स्मारकस्थळी लोटला जनसागर.      -आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत वाहिली सामूहिक आदरांजली

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर-भारतीय जनता पार्टीचे दिवंगत माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय उदय वाघ यांच्या पाचव्या पुण्यस्मृती निमित्त अमळनेर येथिल स्मारक स्थळी मोठा जनसागर दाखल होऊन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.
सुरवातीला महायुती चे असंख्य कार्यकर्ते स्मारक स्थळी एकत्रित आल्यानंतर आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण व प्रतिमा पूजन करण्यात आले.कार्यकर्त्यानी उदय बापु अमर रहे च्या घोषणा दिल्या.आमदार पाटील यांनी भावना व्यक्त करताना बापूंच्या आठवणींना उजाळा देत बापु आजचा दिवस पाहायला तुम्ही हवे होतात या शब्दात सुमानंजली अर्पण केली.यावेळी भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे शहर व ग्रामिण भाग तथा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.याशिवाय इतर पक्षासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील यावेळी उपस्थिती दिली.यायाठिकाणी दिवसभर कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू होती,बाहेर गावाहून देखील असंख्य कार्यकर्त्यानी हजेरी लावली.भावनिक झालेले काही कार्यकर्ते दिवसभर स्मारकस्थळीच थांबून होते.अनेकांनी अश्रूही अनावर झाले होते.खासदार स्मिता वाघ या कामानिमित्त दिल्ली येथे असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह वाघ कुटुंबियांच्या अनुपस्थितीत हा स्मृती दिन घडवून आणला.
दरम्यान स्वर्गीय उदय वाघ म्हणजे भाजपासाठी कार्यकर्ता घडविणारे स्रोत होते,अमळनेर तालुका व मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्हा व परिसरात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केले होते,नावाप्रमाणेच राजकीय वर्तुळात वाघा सारखा दबदबा त्यांनी ठेवला होता,सर्वसामान्य जनतेसाठीही ते हिरो ठरले होते, चळवळ आणि संघर्षातुन निर्माण झालेले ते नेते असल्याने एक स्वतंत्र वलय त्यांनी निर्माण केले होते,पाच वर्षांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना अचानक सोडून ते कायमचे गेलेत मात्र कार्यकर्त्यांच्या मनात आजही बापू कायम असल्याचे आजच्या स्मृती दिनातून दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!