अमळनेर शहरात उष्मघाताचा पहिला बळी… ऊन्हात फिरण्याचे टाडा… डॉक्टरांचा सल्ला…

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर उष्माघाताचा पहिला बळी गेला असून शहरातील तांबेपुरा भागातील विवाहित महिलेचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे . अमळनेरातील 33 वर्षीय रूपाली गजेंद्र सिंग राजपूत या विवाहित महिलेचा उष्माघाताने बळी गेल्याची घटना आज दिनांक 12 मे रोजी तांबेपुरा भागात घडली महिला अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेली होती अकरा मे रोजी सायंकाळी ती रेल्वेने परत आल्यानंतर ऊन लागल्याने तिला अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या त्यामुळे तिच्या पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी ऊन लागल्याचे सांगत गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले थोडा वेळ महिलेला बरेही वाटले मात्र सकाळी उठल्यानंतर पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी साडेदहा वाजता तात्काळ रिक्षा करून शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश ताडे यांनी महिलेचे सवविच्छेदन केले याबाबत अमळनेर पोलिसात महिलेचे दीड दीपक राजपूत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत मात्र सदर मृत्यू उष्माघाताने झाल्याचे स्पष्ट झाले आहे सदर महिलेच्या पश्चात पती सासू-सासरे धीर असा परिवार असून गजेंद्र उर्फ अतुल मंगल सिंग राजपूत यांच्या त्या पत्नी होत्या..