महानगरपालिकेने आठ दिवस इतर सर्व कामे बंद करून फक्त पाणी वितरण व्यवस्था सक्षम करावी …आ.फारुख शाह..

धुळे (अनिस खाटीक) धुळे शहरातील नागरिकांना एक दिवसाआड नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास अपयशी ठरलेल्या महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात२८ सप्टेबर रोजी जन आक्रोश मोर्चा
धुळे शहरातील नागरिकांना एक दिवसाआड नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आ. फारुख शाह यांनी महानगरपालिका

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आमदार कार्यालयात बोलाविली होती या बैठकीत २५ सप्टेंबर पर्यंत 33 केव्ही सबस्टेशन चे काम पूर्ण करून आणि येत्या आठ दिवसात पाणी वितरण व्यवस्थेवर विशेष काम करून पाणी वितरण व्यवस्था सक्षम करणेबाबत चर्चा करण्यात आली.दि.१७ ऑगस्ट रोजी ३३ केव्ही सबस्टेशन ची नेमकी स्थिती आणि अक्कल्पाडा योजनेची स्थिती याची पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.यादौऱ्यात महानगरपालिका,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी सहभागी असतील. यावेळी मनपा प्रशासनाने अशोकनगर जलकुंभ नवीन बांधनेसाठी आणि व्हॉल्व बसविनेसाठी २कोटीची मागणी केली.त्यानुसार आ.फारुख शाह यांनी राज्य शासनाकडून तत्काळ २ कोटीचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.धुळे शहरातील नागरिकांना एक दिवसाआड नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास अपयशी ठरलेल्या महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात२८ सप्टेबर रोजी जन आक्रोश मोर्चा काढून मनपा अधिकारी – पदाधिकारी यांचे कुकर्तुत्व जनतेच्या दरबारात मांडणार असल्याचे आ.फारुख शाह यांनी सांगितले.
बैठकीस धुळे महानगरपालिकेचे देविदास टेकाळे आयुक्त,धुळे मनपा,विजय सनेर,उपायुक्त,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे दिलीप पाटील,वीज वितरण कंपनीचे पवार तसेच अभियंता कैलास शिंदे,सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले,नरेंद्र बागुल आदी उपस्थित होते.