भारताची फाळणी ही ऐतिहासिक चूक.. ओवेसी

0

24 प्राईम न्यूज 17 Oct 2023

भारताची फाळणी कधीच व्हायला नको होती. ती एक मोठी ऐतिहासिक चूक आहे, असे मत एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असाउद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. भारताचे चर्चा ठेवा, फाळणीस वाक्यात उत्तर देणे मला शक्य नाही, असे ओवेसी यांनी

विभाजन होणे हे मोठे दुर्भाग्य जबाबदार कोण ते आहे. तुम्हाला पाहिजे तर चर्चा सांगेन – मी या फाळणीस जबाबदार कोण होते ते सांगेन. एका पत्रकार परिषदे दरम्यान सांगितले हैदराबादचे खासदार असलेले ओवेसी पुढे म्हणाले की, ऐतिहासिकदृष्ट्या भारत एकसंघ होता पण दुर्दैवाने त्याचे भाग झाले असे मला म्हणायचे आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास चर्चेला बोलवा, मी या फाळणीला कोण जबाबदार आहे ते सांगेन. मी एका वाक्यात उत्तर देऊ शकत नाही. त्यावेळी ही ऐतिहासिक चूक करण्यात मात्र आली आहे. त्यांनी देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी लिहिलेले ‘इंडिया विन्स फ्रीडम’ हे पुस्तक वाचण्याचाही सल्ला दिला. त्यात आझाद यांनी काँग्रेसला ही फाळणी टाळण्यासाठी कशी विनवणी केली होती हे देखील या पुस्तकात स्पष्ट करण्यात आल्याचे ओवेसी यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी जे नेते होते ते सर्व फाळणीसाठी जबाबदार आहेत. तेव्हाच्या अनेक इस्लामिक स्कॉलरनी देखील द्विराष्ट्र सिद्धांताला कडाडून विरोध केला होता है देखील ओवेसी यांनी याप्रसंगी अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!