-वायफळ खर्च टाळून मतिमंद मुलांसोबत केला वाढदिवस साजरा.अन्नदान व मुलांना कपडे वाटप,यश वर्मा यांचा आदर्श..

0

अमळनेर/प्रतिनिधि

अमळनेर येथील आशिष अलंकारचे मालक यश वर्मा यांनी वायफळ खर्च न करता मतिमंद मुलांसोबत अमळनेर युवा मित्र परिवारासोबत साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला.
त्यांनी गोर गरीब अनाथ दिव्यांग मुला मुलींना वाढदिवसाचे औचित्य साधत अन्नदान व जे आवश्यक ते कपडे वाटप करुन एक आदर्श समाजापुढे ठेवला.
आपण समाजाला देण लागत या उद्देशाने हा समापयोगी उपक्रम राबाविण्यात आला. अमळनेर युवा मित्र परिवार नेहमी असे कार्य करत असतात रक्तदानासारख जिवदानचे कार्य सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरु आहे. हजारो रुग्णांना प्राण वाचण्यास मदत झालेली असुन ५०० /६०० रक्तदात्यांचा गृप असुन काही मिनीटात रूग्णांना मदत केली जाते “अमळनेर युवा” हा गृप समाज कार्यात नेहमी अग्रेसर असतो यावेळी अमळनेर युवा मित्र परिवाराचे दिनेश तेवर , राहुल आहीरे , भावेश साळूंखे , दीपक प्रजापती , दिपक चौधरी , रिषभ जैन , साई सैंदाणे , राम सैंदाणे व रक्तदान चळवळीचे प्रमुख मनोज शिंगाणे उपस्थित होते. परिश्रम मतिमंद मुला मुलींची शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांनी युवा मित्र परिवाराचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!