राज्यस्तरीय आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धेला शानदार सुरुवात .
फिडे मानांकित खेळाडूची आघाडी..
राज्यातील १६० मूले व मुली खेळाडूंचा सहभाग..

जळगाव (प्रतिनिधि) क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय मुलं आणि मुली १७ व १९ वर्षातील गटातील स्पर्धेला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये रविवार २९ जानेवारी रोजी सुरुवात झाली असून या
या स्पर्धा ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
सोमवारी तीन व मंगळवारी दोन राऊंड होतील.
स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते तर श्री छत्रपती पुरस्कार विजेते गणपतराव पोळ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच स्पर्धेचे मुख्य पंच स्वप्निल बनसोड, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, रवींद्र धर्माधिकारी व प्रवीण ठाकरे व अहमदनगरचे आर्बिटर यशवंत बापट यांच्या उपस्थित करण्यात आले.
उदघाटन, शपथ व मार्ग दर्शन
उपस्थित प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सर्व प्रथम दीप प्रज्वलित करण्यात आले, खेळाडूच्या वतीने मुंबईचा खेळाडू ओम कदम यांनी शपथ घेतली. प्रमुख अतिथी राहुल पाटील यांनी पटलावर चाल चालून उदघाटन केले व खेळाडूंना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मुलींद दीक्षित यांनी सादर केले. सूत्र संचलन फारूक शेख यांनी तर आभार क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात यांनी मानले.
रविवारी झालेल्या सामन्याचा निकाल

१७ वर्षातील गटात मुलांमध्ये मुंबई चा ओम कदम, व वेदांत विखंडे, अरविंद अय्यर,पुणे अक्षय बोरगावकरतर, अमरावतीचा श्लोक चांदराणी मुलींमध्ये अमरावती ची संस्कृती वानखेडे,पुणे ची आदिती कयाल यांनी दोन गुण घेऊन आघाडी घेतलेली आहे
१९ वर्षे आतील
मुलांमध्ये मुंबई गौरांग बागवे, अनिरुद्ध पोतवाल, पुणे चा ओमलमकाने व मुलींमध्ये पुणे ची वावल आदिती, नागपूर आशी दलाल, मुंबई कीर्ती पटेल यांनी दोन गुण घेऊन आघाडी घेतलेली आहे
स्पर्धे साठी पंच
स्पर्धेतील मुख्य पंच नागपूरचे स्वप्निल बनसोडे, सहाय्यक पंच जळगावचे प्रवीण ठाकरे, पंच अहमदनगरचे यशवंत बापट, पुण्याच्या गायत्री कुलकर्णी व वासंती सरवदे, जळगावचे आकाश धनगर ,अरविंद देशपांडे व नथू सोमवंशी हे पंच म्हणून कामगिरी पाहत आहे.