रायगड जिल्हयातील खालापूर नजीक ईशाळगड येथे दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू.. -मा. मंत्री अनिल पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल. -मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. -मंत्री अनिल पाटील..

0

अमळनेर (प्रतिनिधि)रायगड जिल्हयातील खालापूर नजीक ईशाळगड येथे दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर ७५ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे जखमींवर मोफत उपचार केले जातील तर मृतांच्या वारसांना शासनाकडून मदत दिली जाईल असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घटनास्थळावरून सांगितले.
ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य या नात्याने स्वतः तत्काळ घटना स्थळी दाखल झालो, माझ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मंत्री मंडळीतील माझी सहकारी ना.गिरीश महाजन, ना.दादा भुसे, ना. उदय सामंत व आदी सहकारी घटना स्थळी उपस्थित आहेत.

एनडीआरएफच्या २ चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण ४८ कुटुंब येथे आहेत.

सुमारे ७५जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. असेही अनिल पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!