जे चुकीच्या रस्त्यावर गेले आहेत, त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू. -राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार

0

24 प्राईम न्यूज 2 Sep 2023आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून २८ पक्ष एकत्र आले आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी स्थिती आहे. कुठे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कुठे कामगार, युवकांच्या समस्या आहेत. आज जनतेने एका विश्वासाने देशाचा कारभार चालविण्याची जबाबदारी भाजपला दिली. आज त्याच जनतेच्या मनात नाराजीची भावना आहे. लोकशाहीच्या मार्गांने आज आम्ही भाजपच्या लोकांनी टीका केली. भाजप नेते म्हणाले, याची काय आवश्यकता आहे. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते. दहा वर्षे सत्ता हातात आल्यानंतर जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची आवश्यकता असते, त्यापासून नेतृत्व करणारे लोक खूप दूर गेले आहेत.देशातील जनतेने एका विश्वासाने देशाचा कारभार चालविण्याची जबाबदारी भाजपवर सोपवली. पण, त्याच जनतेच्या मनात आज भाजपविरोधात नाराजीची भावना आहे. दहा वर्षे सत्ता हातात असलेल्यांना जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची गरज होती. पण, त्यापासून त्यांचे नेतृत्व खूप दूर गेले. आमच्या एकत्र येण्यावरही ‘घमंडिया’ असे शब्द वापरून भाजपचे नेते टीका करत आहेत. आता आम्ही थांबणार नाही. चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही. जे चुकीच्या रस्त्यावर गेले आहेत, त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू, ते सोबत नाहीच आले तर त्यांना दूर करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!