उद्या पर्यंत निरोप न आल्यास सलाईन काढणार,पाणी बंद करणार असल्याचा गर्भित इशारा, -जरांगे -पाटील

0

24 प्राईम न्यूज 9 Sep 2023 जरांगे-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागण्यांसदर्भात सरकारचा अद्याप निरोप आलेला नाही. दिलेल्या अल्टीमेटमनुसार आज शेवटचा दिवस आहे. उद्यापर्यंत निरोप न आल्यास सलाईन काढणार, पाणी बंद करणार असल्याचा गर्भित इशारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे. ते उपोषणस्थळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकारसाठी आम्ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता मात्र अजून सरकारचा निरोप आला नाही. आज आम्ही सरकारच्या निरोपाची वाट पाहत आहोत. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव जाहीरकरणार नाही. तज्ञ, वकील, शेतकरी असे २० जण शिष्टमंडळात असतील. आमच्याकडून चर्चेची दारं खुली आहेत. उद्या दिवसभर पर्यंत मी सरकारची वाट पाहिन सरकारसाठीच मी सलाईन घेतलं. उद्या शेवटचा दिवस आहे. यानंतर हे सर्व बंद करणार आहे. सलाईन काढणार आणि पाणी देखील सोडणार आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. सरकारच्या जीआर मधून वंशावळी शब्द वगळून त्याऐवजी सरसकट मराठा समाज टाकावा, या मागणीसाठी मनोज जरांगेंचं उपोषण सुरूच राहणार आहे. सरकारने कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी अशा नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा जीआर काढला. त्यातील वंशावळी शब्दाला जरांगे यांनी आक्षेप घेतला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!