महिलांनो संघटीत झाल्याशिवाय पर्याय नाही – सुनील देवरे

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – शेतकऱ्यांच्या जिवावर सर्व अर्थव्यवस्था चालते,व्यापार चालतो,सर्व व्यावसायिक संघटीत पणे व्यापार करतात मग आपणच का संघटीत होत नाही?पण आता आपण सर्व शेतकरी,महिला,युवक युवती संघटनेच्या माध्यमातून संघटीत होणे आवश्यक आहे कारण संघटीत झाल्या शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले
मेहू (ता.पारोळा) येथे महिला आघाडीची शाखा स्थापनेचा कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा कल्याणी देवरे यांनी मार्गदर्शनात सांगितले की,शेतकऱ्यांच्या सुख-दुखात त्यांची पत्नी,आई, आणि मुलगी खंभीरपणे उभी राहते अगदी त्याच पध्दतीने आता आपण महिला,युवतींना आघाडीच्या माध्यमातून उभे राहायचे आहे तर युवती आघाडी अध्यक्षा कुसुम बाविस्कर यांनी ही युवतींनी संघटनेत का यावे आणि त्याचा फायदा काय याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी महीला आघाडीत नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देत सन्मानित करण्यात आले.
यावेळी गावातील महिला,युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांची झाली नियुक्ती
शाखाध्यक्षा म्हणून कमल पाटील, उपाध्यक्षा सुरेखा पाटील, कार्याध्यक्षा आशा पाटील,माहिती प्रमुख संगिता पाटील,संपर्क प्रमुख मंजुषा पाटील,खजिनदार सुवर्णा पाटील,महासचिव सुनंदा पाटील,सचिव संगिता सुरेश,प्रसार माध्यम प्रमुख शकुंतला पाटील, सल्लागार रंजना पाटील,जेष्ठ मार्गदर्शक मिराबाई पाटील, आरोग्य प्रमुख मंगलबाई पाटील, सदस्य वैशाली पाटील