अमळनेर RPF च्या तत्पर कारवाईत नायडू गँग जेरबंद

आबिद शेख/अमळनेर
– दिनांक 04 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास मध्य रेल्वेच्या RPF भुसावळ, जळगाव आणि खंडवा ठाण्यांना ASI कुलभूषण सिंह चौहान यांना मोबाईलवर माहिती मिळाली की, खंडवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे सामान चोरीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात एका टोळीचा समावेश असल्याचे समोर आले. CCTV फुटेजच्या आधारे आरोपी कपडे बदलून वेगवेगळ्या स्टेशनवर फिरत असल्याचे निदर्शनास आले. खंडवा ठाण्यात या संदर्भात FIR नोंदवण्यात आला.
हीच टोळी भुसावळ-उधना मेमो (गाडी क्रमांक 19106) मध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर RPF वरिष्ठ निरीक्षक सत्यजीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ASI कुलभूषण सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली HC नंदू पाटील आणि CT अर्जुन सिंह यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय टीमने अमलनेर स्टेशनवर कारवाई केली.
गाडी येताच सामान्य डब्यांमध्ये कसून शोध घेतल्यानंतर चार संशयित आढळून आले. तिकीट तपासणीच्या बहाण्याने चौकशी करत त्यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी आपली ओळख पुढीलप्रमाणे दिली –
- अविनाश पिता महारनन्ना नायडू (वय 25, रा. वाकीपाडा, मरीमाता मंदिराजवळ, नवापूर, महाराष्ट्र)
- अजय पिता महारनन्ना नायडू (वय 25, रा. वाकीपाडा, मरीमाता मंदिराजवळ, नवापूर, महाराष्ट्र)
- काली पिता कुन्नईया नायडू (वय 29, रा. वाकीपाडा, मरीमाता मंदिराजवळ, नवापूर, महाराष्ट्र)
- राजा पिता आरमबम (वय 33, रा. अमर नगर, एमआर 4 रोड, उज्जैन, मध्य प्रदेश)
या चौघांनी आपला संबंध नायडू गँगशी असल्याचे मान्य केले. या टोळीत 8-9 जणांचा समावेश असून ते रेल्वे स्थानकांवर आणि शहरी भागात चोरी करत असल्याची कबुली दिली. नुकतीच त्यांनी खंडवा आणि इतर ठिकाणी चोरी केल्याचे उघड झाले.
चोरीला गेलेली मालमत्ता जप्त
अटक केलेल्या आरोपींकडून खालील चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आला –
- DELL व HP कंपनीचे 2 लॅपटॉप
- Samsung चे 4 अँड्रॉइड मोबाइल
- Vivo चा 1 अँड्रॉइड मोबाइल
- 5 मोबाइल चार्जर
- Samsung आणि Nokia चे 2 कीपॅड मोबाइल
- Belton कंपनीची घड्याळ 1
- 1 इयरफोन
- रोख रक्कम ₹46,600
- 2 धारदार चाकू
एकूण अंदाजे मालमत्तेची किंमत ₹2,81,200 एवढी आहे.
या कारवाईची माहिती भुसावळ, जळगाव आणि खंडवा RPF ठाण्यांना देण्यात आली. काही वेळानंतर भुसावळ विभागाच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक व जळगाव उपनिरीक्षक अमळनेर पोस्टवर पोहोचले. त्यांनी चारही आरोपींना योग्य स्थितीत ताब्यात घेतले.
रेल्वे प्रवाशांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी RPF अमळनेर च्या पथकाने तातडीने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.