जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा एकता संघटनेतर्फे गौरव..

0

आबिद शेख/अमळनेर

जळगाव – महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याच्या १०० दिवसांच्या मर्यादित कालावधीत जळगाव जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा एकता संघटनेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ आणि स्मृती चिन्ह (फ्रेम) देऊन जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव केला. हा पुरस्कार जळगाव जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे संघटनेच्या सदस्यांनी यावेळी सांगितले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

सत्कार सोहळ्यात संघटनेचे समन्वयक फारुक शेख आणि अनिस शहा यांनी स्मृती चिन्ह प्रदान केले. नदीम मलिक व मजहर खान यांनी शाल अर्पण केली, तर मतीन पटेल आणि सलीम इनामदार यांनी श्रीफळ अर्पण करून सत्कार पूर्ण केला.

शिष्टमंडळातील मान्यवर

या कार्यक्रमाला फारुक शेख, नदीम मलिक, मजहर खान, मतीन पटेल, अनिस शहा, सलीम इनामदार, महमूद पिंजारी, समीर शेख, कासिम उमर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!