अमळनेर शहरात पाणीपुरवठा अधिकाऱ्याविरोधात तीव्र नाराजी; तत्काळ बदलीची मागणी..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. भाजपा युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस समाधान नाना पाटील यांनी पाणीपुरवठा अधिकारी विजय विसावे यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अर्ज सादर केला आहे.

समाधान पाटील यांनी आरोप केला आहे की, अधिकारी नागरिकांच्या फोन कॉल्स उचलत नाहीत आणि उद्धट भाषा वापरतात. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अधिकाऱ्याचा वर्तन उद्धटपणाचे आहे. “नाही सोडायचं मला पाणी, तुमच्या कडून जे होईल ते करून घ्या, मी CO साहेबांशी बोलून घेईल, मी कोणाला घाबरत नाही” अशा प्रकारची वर्तणूक अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा मोठा तुटवडा जाणवत असून, रहिवासी त्रस्त झाले आहेत. या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरवासीयांची नाराजी वाढत असून, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

समाधान पाटील यांनी दिलेल्या निवेदनात, पाणीपुरवठा अधिकाऱ्याची त्वरित बदली करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. आता नगरपरिषद प्रशासन या तक्रारीवर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!