गोकुलधाम सोसायटीजवळील खड्डा अपघाताला निमंत्रण – जबाबदार कोण?

0

आबिद शेख/ अमळनेर

पश्चिमेतील गलावडे रोडवरील गोकुलधाम सोसायटीजवळ रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांसाठी संकट ठरत आहे. सोसायटीच्या शौच खड्ड्यातून वहाणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे, जो कुठल्याही क्षणी मोठा अपघात घडवू शकतो.

प्रशासनाची दुर्लक्ष, नागरिकांचा जीव धोक्यात

कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येते, पण काही महिन्यांतच रस्त्यांची दुरवस्था होते. नागरिक वारंवार तक्रारी करत असले तरी प्रशासन आणि संबंधित अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत.

समजा, या खड्ड्यामुळे एखाद्याचा अपघात होऊन जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? प्रशासन? स्थानिक स्वराज्य संस्था? की संबंधित कंत्राटदार?

तातडीने कारवाईची मागणी

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. जर लवकरच उपाययोजना झाली नाही, तर नागरिक तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

➡️ प्रशासनाने लवकरात लवकर हा खड्डा बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा संभाव्य दुर्घटनेसाठी तेच जबाबदार राहतील!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!