पाडळसरे धरणासाठी आंदोलन करणाऱ्या १६ कार्यकर्त्यांची ४ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता..


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87950/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72600/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 985/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
अमळनेर – पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये निम्न तापी प्रकल्पासाठी केलेल्या आंदोलनानंतर दाखल झालेल्या खटल्यात तब्बल ४ वर्षांनी अमळनेर येथील न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि परिसरातील ६ तालुक्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या कामाला गती देण्यासाठी १९ एप्रिल २०१९ रोजी समितीच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमळनेर दौऱ्यावेळी आंदोलन केले होते. भद्रा प्रतीक मॉलसमोरील रस्त्यावर काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समितीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी कुलगुरू डॉ. शिवाजीराव पाटील, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, माजी शेतकी संघ अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह १६ जणांविरुद्ध भा.दं.वि. कलम १८८ आणि १४३ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी ३० एप्रिल २०२२ रोजी आरोपपत्र दाखल झाले होते.
सतत ४ वर्षे चाललेल्या या खटल्यात आंदोलनकर्ते प्रत्येक सुनावणीला हजर राहत होते. त्यांच्या वतीने अॅड. दिनेश दयाराम पाटील यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. अखेर २ मे २०२५ रोजी २रे सह-दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा. ए.ए. जोंधळे यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम २५५(१) अंतर्गत निर्दोष मुक्त केल्याचा निकाल दिला.
आंदोलनकर्त्यांमध्ये सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, व्यापारी आणि शेतकरी यांचा समावेश होता. आंदोलनाच्या काळात समितीचे हेमंत भांडारकर, भरत पाटील, सेवानिवृत्त पी.आय. गोकुळ पाटील, भरतसिंग परदेशी, देवानंद बोढरे, प्रशांत भदाणे यांनी जामीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.
या निर्णयामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून आंदोलक आणि अॅड. दिनेश पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे.