महिलांच्या सन्मानार्थ छत्रपती शिवरायांचे कार्य मोलाचे. .
वसुंधरा लांडगे

0

अमळनेर (प्रतिनिधि)शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व महिलांच्या सन्मानासाठी रक्ताचे पाणी करणारे सतराव्या शतकातील एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज होते .असे प्रतिपादन खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी केले. युवा कल्याण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर प्रा. अशोक पवार व पर्यवेक्षक एसबी निकम सर उपस्थित होते.
राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात 75 वक्ते व 75 ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्याने देण्याच्या अभियानाला सुरुवात झाली. अमळने शहरातील सर्व शाळा महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी वक्त्या मुक्तमाला पाटील व भाविका सुरेश वाल्हे या विद्यार्थिनींची उत्कृष्ट भाषणे झाली. राष्ट्रीय महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी अभियान सुरू झाले आहे. घरातील प्रत्येकाला किमान एक तरी महापुरुषावर दहा मिनिट बोलता आले पाहिजे. या अभिनव अशा अभियानात विद्यार्थी ,शिक्षकांनी, पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रास्ताविकात प्रा. अशोक पवार यांनी केले.
अमित पाटील सर यांनी कार्यक्रमा चे उत्कृष्ट संचलन केले. व्यासपीठावर के.पी. पाटील, के आर बाविस्कर उपस्थित होते . जी एस हायस्कूल अमळनेर येथे झालेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!