विधी आयोगाने समान नागरी कायद्या बाबत मत मांडण्याची मुदत २८ पर्यंत वाढवली. -सर्व समाजाने आपली मते त्वरित नोंदवावी – फारुक शेख

0

जळगाव (प्रतिनिधि)

जळगांव जिल्हा मनीयार बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगाव व राज्यातील सर्व समाज ( खास करून आदिवासी, तडवी, भिल्ल,अनुसूचित जाती जमाती, शिख, पारसी, बौद्ध) आणि न्यायप्रेमी जनतेला आवाहन केले आहे की, जर त्यांना देशाची विविधता आणि धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य टिकवाय

चे असेल तर त्यांनी समान नागरी कायद्याच्या विरोधात विधी आयोगा कडे आपले तर्कसंगत मत नोंदवावे.काही कारणास्तव ते अद्याप आयोगाला त्यांचे मत किंवा सूचना देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी सूचना देण्याची मुदत २८ जुलैपर्यंत वाढवली आहे.
जळगांव शिष्टमंडळाची भेट व विनंती
जळगांव जिल्हयातील शिष्टमंडळाने १३ जुलै रोजी प्रत्यक्ष दिल्ली येथे फारुक शेख यांच्या नेतृत्वात विधी आयोगाचे मेंबर सेक्रेटरी के बिस्वाल यांची भेट घेऊन विनंती केली होती की मते मागण्याचा कालावधीत वाढ करण्यात यावी त्या प्रमाणे आयोगाने विनंतीचा मान राखून १५ दिवसाची मुदत वाढ दिलेली आहे.
मेल,स्कॅन अथवा पोस्टाने आपली मते नोंदवा
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व विधी आयोगाने आपल्या लिंक जारी केल्या असून त्या द्वारे आपण आपले सविस्तर मत, अभिप्राय या लिंकद्वारे पाठवू शकतात.

तसेच स्कॅन करण्यासाठी युपिआय कोड सुद्धा उपलब्ध आहे.
कोणा व्यक्तीला अथवा संघटनेला लेखी अर्ज द्यावयाचा असेल तर तो फॉर्म मनीयार बिरादरी च्या रथ चौक तसेच ईद गाह ट्रस्ट च्या कार्यालयात उपलब्ध असून तो भरून कार्यालयातच २४ जुलै पर्यंत जमा करावा म्हणजे ते सर्व फॉर्म दिल्ली येथे संयुक्त रित्या पाठवू असे आवाहन शेख यांनी केले आहे.
१) पर्सनल लॉ ची लिंक
https://tinyurl.com/nouccisAIMPLB

२)आयोगाची लिंक membersecretary-lci@gov.in
३) स्कॅन कोड.(सोबत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!