सरकारचा दोन्ही दगडांवर पाय.
आरक्षणावरून जयंत पाटील यांची टीका.

24 प्राईम न्यूज 12 Nov 2023

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारमध्ये मतभेद आहेत. सरकारमधील काही लोक ओबीसींना तर काही मराठा समाजाला चुचकारत आहेत. यातून सरकारचा दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा विचार असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका शरद पावर गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. सरकारला विनंती आहे की तुम्ही एकाठिकाणी बसा आणि याबाबतयोग्य निर्णय करा, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणाच्याही भावना दुखवायचा नाहीत, पण मराठा आरक्षणाबाबत काय करणार, ओबीसींचे काय करणार, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहेच, मात्र महत्वाच्या पदांवर बसलेले दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत काहीच बोलत नाहीत. त्यांनीही बोलले पाहीजे, असा टोला पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नाव न घेता लगावला.